Shanta Shelke Information In Marathi रोजच्या धावपळीच्या जीवनामधून माणसाला मनोरंजन देखील फारच गरजेचे असते, आणि या मनोरंजनाच्या क्षेत्रात अनेक व्यक्तींनी मोलाची कामगिरी केली आहे. त्यामध्ये अनेक कवी, लेखक, गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री यांचा समावेश होतो.
शांता शेळके यांची संपूर्ण माहिती Shanta Shelke Information In Marathi
अशीच एक भारतीय वंशाची लेखिका, गीतकार, कवयीत्री म्हणून ज्यांना ओळखले जाते, अशा शांता शेळके यांचा जन्म पुणे जिल्ह्यामध्ये झाला होता. त्या सुप्रसिद्ध मराठी गीतकार, लेखक असण्याबरोबरच त्यांच्या निसर्ग कवितेसाठी फारच प्रसिद्ध होत्या. त्यांनी पद्य लिखाणा बरोबरच गद्य लिखाणांमध्ये देखील मोठी कामगिरी केलेली आहे.
ज्यामध्ये लघु कथा, कादंबरी, नाटक, यांचा देखील समावेश होतो. लहानपणापासून त्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळाले होते. आपल्या प्राथमिक शिक्षणाला त्यांनी गावामध्येच पूर्णत्व दिले, आणि उच्च शिक्षणाकरिता मुंबई येथे प्रस्थान केले. त्या संस्कृत या विषयांमधील पदव्युत्तर पदवी मिळवणाऱ्या महिला होत्या.
यामध्ये त्यांनी सुवर्णपदक देखील पटकावलेले होते. पुढे त्यांनी साहित्य क्षेत्रामधील डॉक्टरेट पदवी अर्थात पीएचडी मिळवली होती. आजच्या भागामध्ये आपण या सुप्रसिद्ध मराठी लेखिका, कवयित्री आणि गीतकार म्हणून ओळखले जाणाऱ्या शांता शेळके यांच्या बद्दल माहिती बघणार आहोत…
नाव | शांता शेळके |
संपूर्ण नाव | शांता जनार्दन शेळके |
जन्म दिनांक | १२ ऑक्टोबर १९२२ |
जन्मस्थळ | इंदापूर |
शैक्षणिक वास्तव्य | मुंबई विद्यापीठ आणि परशुराम भाऊ महाविद्यालय |
मृत्यु दिनांक | ६ जून २००२ |
मृत्यू स्थळ | पुणे |
मृत्यू कारण | कर्करोग |
पुण्याच्या इंदापूर या ठिकाणी शांता शेळके यांचा जन्म दिनांक १२ ऑक्टोबर १९२२ या दिवशी झाला. त्यांनी लहानपणापासूनच शिक्षणामध्ये चांगले यश मिळवले होते. शिक्षणाची प्रचंड आवड असल्यामुळे त्यांच्या पालकांनी देखील त्यांना शिक्षण घेण्यास सर्वतोपरी मदत केली होती.
त्यांनी प्राथमिक शिक्षण पुण्यातीलच राजगुरुनगर येथे घेतले होते. त्यांच्या विद्यालयाचे नाव महात्मा गांधी विद्यालय असे होते. पुढे पुण्यात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पदवी अभ्यासक्रम करिता एस पी महाविद्यालय निवडले होते. त्यानंतर पदवी मिळवण्याकरता त्यांनी थेट मुंबई गाठले, आणि तेथील विद्यापीठातून संस्कृत विषय घेऊन प्रथम क्रमांकाने पदव्युत्तर पदवी पूर्ण केली होती.
त्यांना साहित्य क्षेत्राची बालपणापासूनच आवड असल्यामुळे आपल्या अभ्यासक्रमानंतर त्यांनी पाच वर्षांसाठी नवयुग या साप्ताहिकांमध्ये संपादकाचे देखील कार्य केले होते. या साप्ताहिकाचे मालक आचार्य अत्रे होते. पुढे नागपूर येथील हीश्लोप महाविद्यालयामध्ये त्यांनी लेक्चरर म्हणून दिले कार्य केलेले आहे. त्यांनी अनेक ठिकाणी कार्य करत करत चित्रपट सेन्सॉर बोर्डासाठी देखील कार्य केलेले आहे.
शांता शेळके यांनी अनेक प्रकारचे साहित्य निर्मिती करून मराठी साहित्याला आणि उपजतच मराठी भाषेला फार समृद्ध केलेले आहे. त्यांच्या लेखन कार्यामध्ये कादंबरी, कविता, गीत संग्रह, कथा विविध गोष्टींची समीक्षणे, परिचय, मुलाखती इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.
मराठी साहित्याची आवड असणे बरोबरच त्यांनी इंग्रजीला देखील आपलेसे केले होते. इंग्रजी चित्रपट सृष्टीमध्ये कार्य करताना इंग्रजी वृत्तपत्रांसाठी देखील लेखन केले होते. त्यांनी मद्रागी, ज्ञात निरक्षरता, पाण्याचे शरीर इत्यादी विषयांवर वर्तमानपत्रांमध्ये स्तंभलेखन देखील केलेले आहे.
सोबतच त्यांनी धूळ, मानसे वडीलधारी, आठवणी, अवध निवद, नाला पावसाचा, आणि झाड आनंदाचे यांसारखी इतर साहित्य देखील लिहिलेले आहे. १९५० ते १९६० या दशकामध्ये गीत लेखनाकरिता सर्वात प्रसिद्ध व्यक्ती म्हणून शांता शेळके यांचे नाव गाजले होते. त्या कुठल्याही प्रसंगावर अगदी सहज लिहू शकत असत.
त्यांच्या आयुष्यातील सर्वात पहिले चित्रपट गीत म्हणून राम राम पाव्हणं या चित्रपटातील गीताचा समावेश होतो. जे त्यांनी १९५० या वर्षी लिहिले होते. त्याच बरोबर त्यांच्या सुप्रसिद्ध गाण्यांमध्ये रेशमाच्या रेघांनी लाल काळया धाग्यांनी हे लावणी वजा गीत फारच गाजले होते. आणि इथूनच त्यांचा प्रसिद्धीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती.
शांता शेळके यांना मिळालेले पुरस्कार:
आपल्या प्रत्येकाने रेडिओ ऐकला असेलच, त्यामध्ये ‘मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश’ हे गीत प्रत्येकाने ऐकले असेल. या गाण्याकरिता शांत शेळके यांना सूर सिंगर हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता. त्याचबरोबर भारत सरकार द्वारे दिला जाणारा गीता लेखनाचा भुजंग हा पुरस्कार देखील त्यांनी प्राप्त केला होता.
ग ती माडगूळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात आलेला पुरस्कार देखील त्यांनी १९९६ या वर्षी पटकावला होता. पुढे २००१ या वर्षी मराठी साहित्यातील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठा पुरस्कार मिळवण्यामध्ये त्या यशस्वी झाल्या. मात्र त्यानंतर एकाच वर्षात त्यांचे निधन झाले.
शांता शेळके या केवळ कविता रचनेसाठीच नव्हे, तर चित्रपट गीत लिखनासाठी खऱ्या अर्थाने प्रसिद्ध होत्या. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये अनेक मराठी चित्रपट गीते लिहिलेली असून, त्यांची संख्या २०० पेक्षा देखील अधिक आहे. त्याकाळी संगीत दिग्दर्शकांना सर्वात आवडणाऱ्या लेखकांना पैकी त्यांचे नाव होते.
त्यांनी अनेक मराठी दिग्दर्शकांसोबत कार्य केलेले असून, त्यामध्ये सुधीर फडके, वसंत देसाई, हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारख्या व्यक्तींचा समावेश होतो. त्यांनी मराठी साहित्यात फार उत्तम समजली जाणारी सर्वसख्य नावाची कादंबरी लिहून मोठी प्रसिद्धी मिळवली होती, ते वर्ष १९६१ हे होते.
या कादंबरीमध्ये त्यांनी महिला मुक्ती तसेच महिलांचे सक्षमीकरण या बाबतीत लेखन केलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक नाटके देखील लिहिलेली आहेत, जी अजरामर झालेली आहेत.
निष्कर्ष:
जीवनातील दोन क्षण आनंदाचे करण्यासाठी संगीत आणि गीत यांचा फार मोठा वाटा आहे. कितीही मूड खराब असला तरी देखील थोड्याशा संगीत ऐकण्याने मनाला ताजेपणा वाटत असतो. त्याचबरोबर व्यक्ती अतिशय प्रसन्न होऊन सुखावत असतो. या गीतांची निर्मिती करण्याकरिता अनेक व्यक्ती कारणीभूत असल्या, तरी देखील या गीताला बोल देण्याचे कार्य गीतकार करत असतात.
असेच एक गीतकार आणि कवयित्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शांता शेळके महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत. त्यांची गाणी ऐकली की मन कसे प्रसन्न होऊन जाते. आजच्या भागामध्ये आपण याच शांता शेळके यांच्या जीवन चरित्राबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे.
यामध्ये त्यांचा जन्म, प्रारंभिक जीवन, शैक्षणिक जीवन, साहित्य क्षेत्र मधील योगदान, त्यांच्या विविध कादंबऱ्या आणि गितसंग्रह, त्यांना मिळालेले विविध पुरस्कार, त्याचबरोबर प्राप्त झालेले सन्मान, त्यांनी लिहिलेली काही सुप्रसिद्ध गाणी, इत्यादी माहिती बघितली आहे. सोबतच काही प्रश्न उत्तरे देखील अभ्यासले आहेत.
FAQ
शांता शेळके यांचे संपूर्ण नाव काय होते?
शांता शेळके यांचे संपूर्ण नाव शांता जनार्दन शेळके असे होते.
शांता शेळके यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता, आणि कोणत्या तारखेला झाला होता?
शांता शेळके यांचा जन्म इंदापूर या ठिकाणी दिनांक १२ ऑक्टोबर १९२२ या दिवशी झाला होता.
शांता शेळके यांनी आपले शिक्षण कोणकोणत्या ठिकाणी पूर्ण केले होते?
शांता शेळके यांनी आपले प्राथमिक शिक्षण आपल्या जन्मगावीच पूर्ण केले होते. त्याचबरोबर त्यांनी सर परशुराम भाऊ महाविद्यालय तसेच मुंबई विद्यापीठ या ठिकाणी देखील शिक्षण घेतले होते.
गीतकार शांता शेळके यांच्या मृत्यू बद्दल काय सांगता येईल?
शांता शेळके यांचा मृत्यू वयाच्या ८० व्या वर्षी पुण्यामध्ये कर्करोगाच्या कारणांनी झाला होता. तो दिन ०६ जून २००२ हा होता.
शांता शेळके यांनी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे?
शांता शेळके यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केलेले असून, त्यांनी एम ए ही पदव्युत्तर पदवी संस्कृत विषय घेऊन केली होती. त्याचबरोबर त्यांनी साहित्य क्षेत्रातील डॉक्टरेट पदवी देखील मिळवलेली आहे.